25 May 2025

जगातली चौथी अर्थव्यवस्था आणि आमची बोंबाबोंब.

सकाळी सकाळी बातम्या ऐकत होतो. नीति आयोगाने घोषणा केली कि भारत आता जगातील चौथी आर्थिक व्यवस्था बनला आहे. भारी आनंद झाला राव! इतक्यात घरातून आवाज आला, भाजी संपली आहे, आता आणली नाही तर बिना भाजीचे जेवण करावे लागेल. पर्याय नव्हता, उठलो आणि निघालो भाजी आणायला.

     रस्त्यातच एक भाजीवाला गाडा भेटला. अंगावर फाटके कपडे, मरतुकडा जीव, भलामोठा गाडा हाकत फिरत होता. त्याच्याकडे पिशवीभर भाजी घेतली आणि विचारलं किती झाले भैय्या?  त्याने मनातल्या मनात हिशोब केला आणि सांगितलं, ₹700/- साहेब. गाड्यावर एक नजर फिरवली आणि विचारल या गाड्यावरच्या संपूर्ण मालाची किंमत काय? उत्तर आल, 70,000 साहेब. त्याच्याकडे नखशिखांत नजर टाकत ओठावर आलेला प्रश्न विचारून टाकला, बाबा रे एवढे पैसे रोज कुठून आणतोस? त्याने सांगितलं, साहेब आडतीवर उचल मिळते. रोज सकाळी माल घ्यायचा, दिवसभर विकायचा नी संध्याकाळी अडत्याला पैसे परत करायचे, दुसऱ्या दिवसांसाठी उचल घ्यायची, परत माल उचलायचा आणि विकायचा. मला प्रश्न पडला, की आडत्याला रोज पैसे का दाखवायचे? त्याने सांगितलं, कि मी रोज मार्केटमध्ये आहे याची खात्री करण्यासाठी रोज त्याच्याकडे हजेरी द्यावी लागते. रोजच्या रोज व्याज काढून घेतो. म्हटल शाब्बास, पाकिस्तानला पैसे देऊन तो कुठे खर्च करतो हे न बघणार्या आयएमएफ पेक्षा, हा अडती अधिक हुशार आहे.

     आता हिशोब केला, हां भाजीवाला रोज 50,000/- ची भाजी विकत घेतो, त्यातला पाच हजारांचं व्याज देतो, ₹70,000/- ची विक्री करतो, आणि 15,000 घरी घेऊन जातो. याची रोजची उलाढाल 1,25,000/-. म्हणजे माझ्या महिन्याच्या उत्पन्नाबरोबर. म्हणजे याची अर्थव्यवस्था माझ्यापेक्षा 30 पटींनी जास्त मोठी आहे. तरीही तो झोपडीत, उन्हातानात. मी त्याला उद्यापासून तुझी भाजी घेणार नाही म्हणून धमकी देऊ शकतो.

आता त्याच्या आणि माझ्या जीडीपीचा हिशोब, चड्डीवाल्या अर्थशास्त्रज्ञांनी करावा आणि जमल्यास स्वतःलाच समजावून सांगावा.

थोडा पुढे गेलो तर नुकतेच बँकेतून रिटायर झालेले आणि स्वप्नातल घर बांधून त्यात आलिशान राहणारे  गल्लीतलेच काका भेटले. त्यांनी मला सांगितले, माझा बंगला बिल्डरला दिला आहे, दोन फ्लॅट माझ्याकडे राहतील बाकी बिल्डर विकणार आहे, तुम्हाला इण्टरेस्ट असेल तर घ्याल का, मला चांगला शेजारी मिळेल. त्यांना विचारलं, काका तुम्ही निवृत्त आयुष्य मजेत घालवण्यासाठी आयुष्यभराची प्लॅनिंग करून हे घर बांधलेल. ते म्हणाले, घराचा टॅक्स आणि मेंटेनन्स मध्ये माझी अर्धी पेन्शन संपेल. वर पुण्यात राहणार्या पोराला, स्वतःचा फ्लॅट नसेल तर कोणी पोरगी देणार नाही. आता त्यांचा जीडीपीचा हिशोब केला. स्वतःच्या घरात राहून आयुष्य घालवत असताना, त्यांची अर्थव्यवस्था पेन्शनपुरती मर्यादित. आता येत्या वर्षात, बिल्डर त्यांच्याकडून पाच फ्लॅटची खरेदी खते करून देणार, वरून दोन फ्लॅट त्यांच्या नावे करून देणार, म्हणजे अर्थव्यवस्था झाली किमान रुपये 7,00,00,000/- ची. वरून पोरासाठी घ्यायच्या फ्लॅटचे रुपये 1,00,00,000/- म्हणजे यांची अर्थव्यवस्था रुपये 8,00,00,000/- हे बंगल्यातून फ्लॅटमध्ये राहायला जाणार. अर्थव्यवस्था भक्कम झाली की आजारी पडली, झिंग चढलेल्या अर्थतज्ञांनी जरा समजून सांगावे.

     बरे त्या भाजीवाल्याच्या घरात चार पोरे,  प्रत्येकजण 18 व्या वर्षी पंचर दुकान काढून स्वतंत्र. पेन्शनर काकांच्या घरचा एकमेव पोरगा अजूनही बेकार. थोडक्यात, स्टेशनवर चहा विकणारे आणि भजे तळणारे सगळे पोस्टग्रॅजुएट आमच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ. एवढी मजबूत अर्थव्यवस्था उभी करणे सोपे नाही राव.

         आणि हो, 10 वर्षापूर्वी आमच्या अर्थव्यवस्थेचा कारभार, ₹50/- प्रती डॉलरनी व्हायचा. आकडा छोटा दिसायचा हो. आता आम्ही 100/- प्रती डॉलर विकत घेतो. आमची अर्थव्यवस्था मोठी झाली की नाही?

वाद करायचा नाही.  

मोदी है, तो मुमकीन हैl


VAKILSAHEB

23 August 2024

VAKILSAHEB

        अहमदपूर येथील मराठा कुणबी स्मशानभूमी प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाचा समाजाचे बाजूने न्यायनिर्णय.
अहमदपूर येथील मराठा कुणबी स्मशान भूमीबाबत सन २००३ पासून जमिनीच्या मूळ मालकाच्या सुनेने वाद निर्माण केला होता. माननीय उच्च न्यायालयाने (माननीय न्यायमूर्ती किशोर संत) सदरचा न्यायनिर्णय देताना सदर वादीने तिच्या सासऱ्याकडून करून घेतलेले खरेदीखतच बेकायदेशीर असल्याचा निष्कर्ष नोंदवत सदर जमिनीचा वापर स्मशानभूमी म्हणून सन १९६० पूर्वीपासूनच निरंतर वापर होता व आहे असा निष्कर्ष नोंदवत मराठा कुणबी समाजाचा स्मशानभूमीवरील अधिकार अधोरेखित व कायम केला आहे. सदरची स्मशानभूमी अहमदपूर येथील सर्वे क्रमांक १९८ पोट हिस्सा क्रमांक २ मध्ये १ हेक्टर २० आर क्षेत्रावर स्थित आहे. सदर प्रकरण प्रलंबित असताना वादीने अंतिम संस्कारासाठी गेलेल्या अनेक लोकांवर फौजदारी केसेस दाखल करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. आज तब्बल वीस वर्षानंतर अहमदपूर येथील मराठा कुणबी समाज सदर कुचंबणेतून मुक्त झाला आहे.
See insights and ads
All reactions:
Uday Sabnis

19 August 2024

VAKILSAHEB


रक्षाबंधन 

काश, शांता बचपन में बालक राम के साथ कुछ दिन रह पाती,

प्रभू राम में सीतादेवी से अग्निपरीक्षा  करवाने की सोच कभी ना आतीI

काश, कुंतीदेवी को अपनी एक बेटी होती,

पांडवोकी मती भ्रष्ट होकर द्रौपदी दावं पर कभी न लगतीI

काश, अल्लाह कॆ बंदे को एक भी बहन होती,

दुनिया की आधी बहने हिजाब मे न तडपतीI

काश, किसी मेवाखाऊ या सत्तानाथ को प्यारी बहन होती,

रक्षाबंधन या बहन का प्यार चुनावी निलाम की चीज न बनतीI

 

भगवान की देन है कि मेरे पास प्यारी बहन है,

पुरी दुनिया का भाई बनकर जीने का वचन,

हर साल, बिना भुले, लेकर हि रहती है I

 



10 August 2024

The fainted wall of an old house,

Courting with a naked tree with lost leaves.

But wait, see, there is a friend,

Providing foundation to the house,

Being feeder of the naked tree,

and spreading all the colours from 

it's womb, through the naked one 

to add to the glory of the fainted  one.

It is mother earth, loves us, 

unconditionally,

Though we have built our home 

by exploiting her.

Is it not for us to reciprocate?

VAKILSAHEB